बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे तामिळनाडूत होत असलेला वादळी पाऊस रविवारीही सुरूच होता. येत्या २४ तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. किनाऱ्यावरील भागांत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

पावसामुळे बळी गेलेल्या व्यक्तींची संख्या आता ५९ वर पोहोचली आहे. शुक्रवार-शनिवार दरम्यान कांचिपूरम जिल्ह्य़ात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तिघांचा, तर वेल्लोर जिल्ह्य़ात अंगावर भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. चेन्नईतही खोलगट भागांत पावसाचे पाणी साचले आहे. त्याचा शहरातील वाहतुकीवर आणि संचारव्यवस्थेवर परिणाम होत आहे. रेल्वे आणि वाहने अतिशय कमी वेगाने चालत होत्या. त्यामुळे नागरिकांना अपेक्षित स्थळी पोहोचण्यास विलंब होत आहे. बहुतेक नागरिक घरी राहणेच पसंत करीत आहेत.

rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…