येथून ३५ किलोमीटर अंतरावरील बीलपूर खेडय़ाजवळ राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी उशिरा मध्यरात्री वायूने भरलेल्या टँकरने पेट घेतल्यानंतर त्याचा स्फोट झाल्यामुळे १० जण जळून मृत्युमुखी पडले, तर १२ जण जखमी झाले.
हा टँकर पेटल्यामुळे त्याच वेळी महामार्गावरून जात असलेल्या सात वाहनांनीही पेट घेतला. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर बराच वेळ खोळंबलेली वाहतूक सकाळीच सुरळीत होऊ शकली. मरण पावलेल्या १० जणांपैकी तिघांची ओळख पटली असून त्यांची नावे दक्षुल (६), राधामोहन (४०) आणि विनोद (३७) अशी असल्याचे पोलिसांनी यांनी सांगितले.