वेगवान गोलंदाज वरुण आरोनने सहा बळी घेतल्यामुळेच शेष भारत संघाने गतविजेत्या कर्नाटकचा पहिला डाव २४४ धावांत गुंडाळला आणि इराणी चषक क्रिकेट सामन्यात पहिला दिवस गाजविला. कर्नाटकच्या मयांक अगरवालने अर्धशतक करूनही त्यांचा डाव ४ बाद १०७ असा अडचणीत सापडला होता. करुण नायर व अभिषेक रेड्डी यांनी अर्धशतके लगावताना शतकी भागीदारीही केली. त्यामुळेच कर्नाटकने ही मजल मारली़ शेष भारताने दिवसअखेर एक बाद २० धावा केल्या़संक्षिप्त धावफलककर्नाटक (पहिला डाव) : सर्वबाद २४४ (मयांक अगरवाल ६८, करुण नायर ५९, अभिषेक रेड्डी ५४, वरुण आरोन ६/६३) वि़ शेष भारत (पहिला डाव ) : १ बाद २० धावा