सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर तामिळनाडूने देवधर चषक क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघावर ७३ धावांनी मात केली. तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावांची मजल मारली.

कर्णधार दिनेश कार्तिकने ६ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावांची खेळी केली. नारायण जगदीशनने ७१ धावा केल्या. भारत अ संघातर्फे शार्दूल ठाकूरने ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ संघाचा डाव २३० धावांतच आटोपला. मनदीप सिंगचे शतक व्यर्थ ठरले. त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ९७ धावांची खेळी केली. मनदीपला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. राहिल शाह आणि रविश्रीनिवासन साई किशोर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. या विजयासहतामिळनाडू संघाने २ गुणांची कमाई केली.

संक्षिप्त धावफलक

तामिळनाडू : ५० षटकांत ६ बाद ३०३ (दिनेश कार्तिक ९३, नारायण जगदीशन ७१; शार्दूल ठाकूर ३/४९) विजयी विरुद्ध भारत अ : ४४.४ षटकांत सर्वबाद २३० (मनदीप सिंग ९७; राहील शाह ३/३७).