बॉलिवूडची स्टायलिश दिवा मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट घेतला. सर्वांना ‘मेड फॉर इच अदर कपल’ वाटणाऱ्या या जोडीने तब्बल १८ वर्षे संसार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांमध्ये दुरावा येण्यामागे अर्जुन कपूर असल्याची त्यावेळी चर्चा होती. मलायका आणि अर्जुनमध्ये प्रेमसंबंध असल्याचे तेव्हा म्हटले जात होते. मात्र, आता हे दोघं एकमेकांच्या समोर येणही टाळत आहेत.

वाचा : ईशाने दिला बाळाला जन्म; धर्मेंद्र-हेमा मालिनी पुन्हा एकदा झाले आजी-आजोबा

मलायका आणि अर्जुनचे नाव अनेकदा जोडले गेल्याने त्यांनी आता बहुतेक या चर्चांना पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन एखाद्या पार्टीला जाणार असल्याचे समजताच मलायका तेथे जाणे टाळते किंवा हे दोघंही एकाच पार्टीला गेल्यास आपल्या वेळा एकसारख्या होणार नाहीत याची काळजी घेतात.

वाचा : ‘या’ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार रिंकू

दिवाळीच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी पार्टीचे आयोजन केले होते. त्यातील एका पार्टीला हे दोघंही गेले होते. मात्र, तेव्हाही आपल्या जाण्याची आणि येण्याची वेळ एकसारखी होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. तसेच, पार्टीतून बाहेर पडतानाही त्यांनी वेगवेगळ्या रस्त्याने बाहेर पडणे पसंत केले जेणेकरून, छायाचित्रकारांची नजर त्यांच्यावर पडू नये.