आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा जगात १२० वा तर आशिया-पॅसिफिक भागातील ४३ देशात २५ वा क्रमांक लागला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक कारणांनी परिणाम होत असताना ही आशादायक बाब सामोरी आली आहे.
भारत हा बंदिस्त अर्थव्यवस्था असलेला देश मानला जातो. पण २०१४च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताने चांगली कामगिरी केली आहे. हेरिटेज फाउंडेशन व द वॉल स्ट्रीट जर्नल दरवर्षी या निर्देशांक यादीचे प्रकाशन करीत असते. आपल्या देशाचा आर्थिक स्वातंत्र्य गुणांक ५५.७ असून तो गेल्या वर्षी इतकाच आहे. गेल्या वीस वर्षांच्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताने उत्तरोत्तर प्रगती केली आहे, एकूण ११ अंक त्याने अधिक प्राप्त केले आहेत.
भारत हळूहळू आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पावले टाकीत असून त्या देशाची अर्थव्यवस्था मात्र क्षमतेपेक्षा कमी कार्यशील आहे असे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक यादीचे संहलेखक व हेरिटेज फाउंडेशन सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड अँड इकॉनॉमिक्स या संस्थेचे संचालक टेरी मिलर यांनी म्हटले आहे. भारताने हा निर्देशांक ठरण्यात विचारात घेतल्या जाणाऱ्या दहा सूचकांकापैकी ५ सूचकांकात दोन अंकी संख्येपर्यंत मजल मारली असून व्यापार सूचकांकात ६५ अंकांनी सुधारणा झाली आहे.