एक उत्पादन म्हणून आयुर्वम्यिामुळे अनेक फायदे होतात आणि ते अनेकदा आपल्याला माहीत नसतात. मोठय़ा प्रमाणात तरुणांची वाढती लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात जीवनशैली झपाटय़ाने बदलते आहे. अतिशय कमी वयात दीर्घ मुदतीची योजना घेतल्यास काही खर्चाची पूर्तता करण्यासाठी निधी तयार करता येऊ शकतो. दीर्घ मुदत हे एकमेव वैशिष्टय़ असलेल्या व बचतीशी निगडित असलेल्या आयुर्वमिा योजना लक्षणीय निधी उभा करू शकतात. लहान वयात आवश्यक ती आयुर्वमिा व ‘क्रिटिकल इलनेस’ कवच घेणे योग्य ठरते आणि हे कवच दीर्घ काळासाठी असावे. नंतर जबाबदारी वाढू लागल्यानंतर कवच थोडेसे वाढविता येते.
सुसंस्कृत, शिक्षित तरुणांमध्ये दिसणारी स्वातंत्र्य व जबाबदार वागण्याची जाणीव प्रेरणादायी आहे. मी एकटा असून माझ्यावर कोणीही अवलंबून नाही.. मग मला जीवनकवचाची गरज काय?
मात्र एक उत्पादन म्हणून आयुर्वम्यिामुळे अनेक फायदे होतात आणि ते अनेकदा आपल्याला माहीत नसतात, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
मोठय़ा प्रमाणात तरुणांची वाढती लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात जीवनशैली झपाटय़ाने बदलते आहे. दशकभरापूर्वी असलेल्या वेगाहूनही अधिक वेगाने हा बदल होत आहे. तेव्हा असे फायदे पाहणे गरजेचे ठरेल.
सक्तीची बचतीची सवय :
आयुर्वमिा म्हणजे अल्प आयुष्य जगणे, असा अनेकदा समज केला जातो. मात्र साधारणत: या उत्पादनाची रचना, कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला गमावण्याच्या धोक्यापासून कुटुंबाचे रक्षण करणे यासाठी केलेली असते.
दीर्घायुष्य मिळाल्यानंतरही ही उत्पादने उपयोगी ठरतात, हा मुद्दा सहसा विचारात घेतला जात नाही.
देशातील सरासरी जीवनमान सुधारत आहे (अंदाजे ७४ वष्रे) अशी कल्पना करा. आधुनिक संस्कृती अंदाजे ५० ते ५५ व्या वर्षी निवृत्त होण्याचे आहे.
यामुळे त्यानंतरही२५ ते ३० वष्रे जीवन व्यतित करायचे असते आणि अशा वेळी ‘नेसेसरी एव्हिल’ची भूमिका महत्त्वाची ठरते!
अतिशय कमी वयात दीर्घ मुदतीची योजना घेतल्यास काही खर्चाची पूर्तता करण्यासाठी निधी तयार करता येऊ शकतो. दीर्घ मुदत हे एकमेव वैशिष्टय़ असलेल्या व बचतीशी निगडित असलेल्या आयुर्वमिा योजना लक्षणीय निधी उभा करू शकतात.
५५ ते ६० व्या वर्षीही एखादी व्यक्ती एकटी असेल आणि कोणी अवलंबून नसेल तर ही गुंतवणूक पसंतीची शक्यता अधिक आहे दीर्घ काळापर्यंत लहान रकमेचे योगदान दिल्यास मोठा निधी साठविलेला आढळून येऊ शकेल.
एकटे असण्याच्या आणि कोणी अवलंबून नसल्याच्या वयामध्ये कोणीही जोखीम वा गंभीर आजार आदींचा विचार करत नाही; मात्र त्या वयामध्ये बचतीशी संबंधित विमा योजना खरेदी करणे महत्त्वाचे ठरते. कारण लहान रकमेची दीर्घ काळ सक्तीने बचत केल्याने नंतर अत्यंत उपयुक्त ठरते.
विम्याचा खर्च :
लग्नानंतर आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती असतील आणि घर/वाहन/वैयक्तिक कर्ज या स्वरूपातील जबाबदारी असेल तेव्हाच विमाकवच घ्यावे, असा समज सर्रास आढळतो. मात्र विमाकवचासाठी खर्च हा घटक अनेकदा विचारात घेतला जात नाही.
तरुण असताना – समजा ३० वर्षांहून कमी वयाचे असताना विम्याचा खर्च किंवा ‘क्रिटिकल इलनेस’ छत्राचा खर्च वयाच्या ४०व्या वर्षी योजना घेण्याच्या तुलनेत कमी असतो.
लहान वयात आवश्यक ती आयुर्वमिा व ‘क्रिटिकल इलनेस’ कवच घेणे योग्य ठरते आणि हे कवच दीर्घ काळासाठी असावे. नंतर जबाबदारी वाढू लागल्यानंतर कवच थोडेसे वाढविता येते. वयाच्या चाळीशीनंतर संपूर्ण कवच घेण्याच्या तुलनेत त्याचा खर्चाच्या बाबतीत परिणाम फार कमी होईल.
करविषयक फायदे :
करविषयक फायद्यांशी संबंधित संपूर्ण गुंतवणूक पर्यायांचा विचार करता आयुर्वमिा उत्पादनेही अशाच प्रकारचे फायदे देतात.
संरक्षणासाठी कमी खर्च वा योजनेच्या मुदतपूर्तीच्या वेळी बचतीशी संबंधित फायदे यांच्यासोबत करविषयक फायदे मिळवण्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये विशिष्ट रकमेपर्यंत फायदा मिळू शकतो.
आयुर्वमिा योजना फार क्वचित स्वत:हून खरेदी केली जाते. साधाणत: त्या विकल्या जातात!
परंतु, अंतिम परिणाम पाहिल्यावर ‘नाही’ असे उत्तर न स्वीकारणाऱ्या चिकाटीच्या विमा प्रतिनिधींचे नंतर आभार मानावे लागतील!
फार नाइलाजाने काही वर्षांपूर्वी तुम्ही खरेदी केलेली योजना उतरत्या वयात आíथक बाबी सांभाळण्यात अडचण वा अपयश आले तर प्रत्यक्षात फार पाठबळ देतात.
थोडक्यात – कोणीही अवलंबून नसलेले – एकटी व्यक्ती असली तरीही आयुर्वमिा छत्र आवश्यकच ठरते.
(लेखक एगॉन रेलिगेअर आयुर्विमा कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी आहेत.)