पैसा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता आणि क्षमता आवश्यक असते. माणूस श्रीमंत होण्यासाठी अनेक प्रयत्न करतो, पण कधी कधी त्याची एक छोटीशी चूक सुद्धा त्याच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरते. महान अर्थतज्ञ आचार्य चाणक्य यांनी यामागे काही खास कारणे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य लिखीत नीतिशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, कुबेर धनी झाल्यानंतरही व्यक्ती काही काळाने गरिबीने घेरलेली असते. पैशाचा प्रवाह कायम ठेवला पाहिजेचाणक्य नीति म्हणते की, खर्च न केलेला पैसा साचलेल्या पाण्यासारखा सडतो. पैसा योग्य कामात खर्च केला तरच उपयोग होतो. असे झाले नाही तर सर्वात श्रीमंत माणूसही काही काळ गरीबासारखे जीवन जगू लागतो. आणखी वाचा : Chanakya Niti: कितीही प्रेम केले तरी पत्नी ‘या’ ५ गोष्टी लपवतात, ऐकून चकित व्हाल! पैशाच्या तीन गती असतातआचार्य चाणक्य सांगतात की, धनाच्या ३ चाली आहेत. उपभोग, दान आणि नष्ट करणे. असा पैसा ज्याचा काही भाग परोपकारासाठी दान केला जात नाही, ज्याचा योग्य वापर केला जात नाही, तो पैसा नष्ट होतो. म्हणून जर नेहमी श्रीमंत राहण्याची इच्छा असेल तर त्याचा योग्य वापर करून गरिबांच्या धार्मिक कार्यासाठी दान करावे. आणखी वाचा : Chanakya Niti: ‘या’ ठिकाणी मोकळेपणाने पैसे खर्च करा, बँक बॅलन्स कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढेल! दुसरीकडे, पैसा वापरणे म्हणजे अन्नधान्य किंवा अन्न खरेदी करणे, योग्य कपडे खरेदी करणे, शिक्षण, आरोग्य आणि चांगले जीवन जगण्यासाठी पैसे खर्च करणे. दुसरीकडे, अनावश्यक देखाव्यामुळे किंवा वाईट सवयींमध्ये पैसे खर्च केल्यामुळे, देवी लक्ष्मी रागाने निघून जाते.