Falgun Purnima 2024: हिंदू धर्मात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. होलिका दहन देखील फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होते. हिंदू कॅलेंडरनुसार, या फाल्गुन महिन्याची पौर्णिमा २४ आणि २५ तारखेला येत आहे. याचबरोबर २४ तारखेला होलिका दहनही होत असून वर्षातील पहिले चंद्रग्रहण २५ मार्चला होत आहे. याचबरोबर या दिवशी सर्व उद्दिष्टे साध्य होऊन रवी योगही तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेला अतिशय शुभ योग तयार होत आहेत. ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर केतू आणि चंद्र मीन राशीत असतील. याचबरोब राहू, बुध आणि सूर्य मीन राशीत आणि गुरू मेष राशीत असेल. याचबरोबर मंगळ, शुक्र आणि शनि कुंभ राशीत राहतील. ग्रहांच्या अशा स्थितीनुसार फाल्गुन पौर्णिमेचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप खास असू शकतो. जाणून घ्या या राशींबद्दल…

मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी फाल्गुन पौर्णिमा शुभ ठरू शकते. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल, ज्यामुळे त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाने साथ दिल्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच संपत्तीतही वाढ होईल. व्यवसायात भरघोस यशाबरोबर भरपूर नफाही मिळेल. जर तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित होतील आणि सर्व प्रकारच्या भांडणांपासून मुक्तता मिळेल. पैशाशी संबंधित समस्याही संपुष्टात येतील. आपण बचत करण्यात यशस्वी देखील होऊ शकता.

हेही वाचा – Numerology: ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात बुद्धिमान आणि हुशार, कामाच्या ठिकाणी होते त्यांचे कौतूक

कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठीही फाल्गुन पौर्णिमेचा दिवस चांगला आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र या राशीत असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच येऊ शकतो. कुटुंबात फक्त आनंदच राहील आणि मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. जुने मित्र भेटू शकतात. याचबरोबर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Astrology: या राशीचे लोक पैसे कमावण्यात असतात निपुण! शनिच्या कृपेने होतात मोठे व्यापारी आणि धोरणकर्ते

धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठीही फाल्गुन पौर्णिमेचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता मिळू शकेल. याचबरोबर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. व्यवसायात प्रचंड यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कर्जातून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे जीवनात आनंद येऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते.