वैदिक पंचांगानुसार वेगवेगळे ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करत असतात. हे राशी परिवर्तन काहींसाठी शुभ असते तर काहींसाठी अशुभ. ग्रहांचा राजा म्हणवला जाणारा सूर्य येत्या १६ तारखेला राशी परिवर्तन करणार आहे. यावेळी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. याचा सर्वच राशींवर प्रभाव पडणार असला तरी तीन राशी यावेळी आर्थिकदृष्ट्या बळकट होण्याचे संकेत आहेत. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन शुभ सिद्ध होणार आहे. या राशीच्या दहाव्या घरात हे संक्रमण होणार असून या घराला नोकरी, करिअरचे घर मानले जाते. त्यामुळेच या काळात या राशीच्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते. तसेच नोकरदारांना नव्या जबाबदाऱ्याही मिळू शकतात. यावेळी उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

१२ वर्षांनी तयार होणाऱ्या ‘नवपंचम’ योगामुळे ‘या’ राशींना आकस्मिक धनलाभाची संधी; पाहा तुम्हीही आहात का नशीबवान

  • तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे वृश्चिक राशीतील संक्रमण आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते. हे संक्रमण तूळ राशीच्या दुसऱ्या घरात होणार असून या घराला धन आणि वाणीचे घर म्हटले जाते. या काळात या लोकांना आकस्मिक धनलाभाची संभावना आहे. तसेच, यावेळी बचत करण्यासही हे लोक सक्षम असतील. त्याचबरोबर अडकलेले पैसे या दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

  • वृश्चिक

सूर्य ग्रहाचे संक्रमण या राशींसाठी व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. कारण हे संक्रमण या राशीच्या लग्न घरामध्ये होणार आहे. दुसरीकडे, सूर्यदेव या राशीच्या पाचव्या घराचा स्वामी असल्यामुळे स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आणि फलदायी ठरू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)