औरंगाबाद : सद्गुरूची देशात मोठी परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला त्याला सारे काही मिळाले. चाणक्यंशिवाय चंद्रगुप्त आणि समर्थाशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारणार, असे विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वक्तव्यात चंद्रगुप्त किंवा शिवाजी यांना कमी लेखण्याचा उद्देश नाही तर गुरूशिवाय काय होणार, असा त्याचा अर्थ असल्याचे ते म्हणाले. मात्र, कोश्यारी यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत, असा मतप्रवाह असणारा मोठा वर्ग राज्यात आहे. औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language day maharashtra governor bhagat singh koshyari zws
First published on: 28-02-2022 at 00:24 IST