औरंगाबाद : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी भूसंपादन आता पूर्ण झाले आहे. जमीनही ताब्यात आहे. या प्रकल्पाच्या विरोधामागे बहुमत आहे, असे नाही. पण तरीही हा प्रकल्प पुढे सरकत नसल्याकारणाने या प्रकल्पाचे आर्थिक गणित अजून बसलेले नाही. लोकांना वीज हवी आहे आणि ती परवडेल अशा किमतीत हवी आहे. लोकसंख्या आणि शून्य कर्ब (कार्बन) उत्सर्जनाचे उद्दिष्ट जर या पुढे गाठायचे असेल, तर अणुऊर्जाचा वेग अगदी १००-२०० पटीत वाढवायला हवा. तसे केले तरच मानवी निर्देशांकही वाढेल. देशी तंत्रज्ञांनाही ते अशक्य नाही. असे मत अणुऊर्जा क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळय़ानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.   काकोडकर म्हणाले, की ‘ऊर्जा वापर आणि जीवनस्तर, याची गणिते आता घातली जात आहेत. जगातल्या पुढारलेल्या अवस्थेतील देशातील नागरिकांएवढय़ा सुविधा आपल्याला द्यायच्या असतील, तर सध्याच्या वीज उत्पादनात चार ते पाच पट वाढ करावी लागणार आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior atomic scientist dr anil kakodkar opinion on jaitapur nuclear power project zws
First published on: 28-11-2022 at 03:44 IST