मराठवाडय़ात या वर्षी तुलनेने चांगला पाऊस झाल्याने शहरी भागाला पाणीटंचाई जाणवली नाही. शहरात पाणीटंचाई नाही, असा अहवाल मान्सूनपूर्व बैठकीत मंगळवारी देण्यासाठी म्हणून विभागीय आयुक्त मुंबईला जाणार होते. मराठवाडय़ात या वर्षी पाणीटंचाई नाही, असा दावा अधिकारी करत असताना ग्रामीण भागातील चित्र हळूहळू भीषणतेकडे जाणारे आहे. नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यात नदीपात्रात डोह करून प्लास्टिकच्या फुटक्या बाटलीने हंडा भरावा लागतो, अशी स्थिती आहे. काही ठिकाणी विहिरीत उतरून धोका पत्करून हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. भाजप सरकार येण्यापूर्वी जाहिरातींमध्ये ‘कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र’ असा प्रश्न विचारला जायचा. तेव्हा पाण्याची भीषण टंचाई दाखविण्यासाठी हंडा घेऊन जाणाऱ्या स्त्रिया जाहिरातीत दिसायच्या. आताही परिस्थिती बदललेली नाही. निसर्गाने कृपा केल्याने शहरात पाणीटंचाई नाही. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस ग्रामीण भागातील स्थिती भयावह झाली आहे. दुसरीकडे टँकरचा खर्च मात्र वाढतोच आहे. गेल्या पाच वर्षांत टँकरवर तब्बल चारशे कोटींहून अधिक खर्च झाल्याची आकडेवारी विभागीय प्रशासनाकडे उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील तीन-चार वर्षांच्या तुलनेत यंदा मराठवाडय़ात टंचाई परिस्थिती निवळली असली तरी औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यमध्ये यंदाही टँकर सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता सर्वाधिक २२९ कोटी रुपये २०१५-१६ या वर्षी खर्च करण्यात आला. टंचाई कृती आराखडय़ानुसार नवीन िवधन विहीर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, िवधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, टँकर तसेच बलगाडीने केलेला पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विहीर खोल करणे तसेच गाळ काढण्याच्या कामांसाठी खर्चाचे नियोजन करण्यात आले होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity issue in aurangabad
First published on: 30-05-2018 at 03:46 IST