खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. तुर्कस्तानातील छोटय़ाशा गावात एक शेतकरी व त्याचे कुटुंब रहात असे. शेतीवाडी, पेरणी, कापणी अशी नेहमीची शेतीची कामे तो करी. तो आपल्या शेतात निरनिराळी धान्ये, भाजीपाला पिकवत असे. आणि त्या शेतीच्या उत्पन्नावर तो आपली व कुटुंबाची उपजीविका चालवीत असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदा असेच पेरणीचे दिवस जवळ आले असता त्याने शेतात गहू पेरायचे ठरवले. ज्या दिवशी पेरणी करायची ठरली त्या दिवशी अतिशय जोराचा राक्षसी पाऊस कोसळला. इतका जोरात- जणू ढगफुटी झाली की काय असे वाटण्यासारखा पाऊस प्रचंड विजांच्या कडकडाटांसह कोसळला. तेव्हा शेतकऱ्याने देवाकडे प्रार्थना केली, ‘‘हे देवा, आता पावसाऐवजी जरा ऊन पडले तर मी गव्हाची पेरणी तरी करू शकेन.’’ आणि काय आश्चर्य. खरोखरच पाऊस थांबून छान सोनेरी ऊन पडले. शेतकऱ्याने गव्हाची पेरणी केली. पेरणी झाल्यावर मात्र त्याने दोन दिवसांत देवाकडे प्रार्थना केली. ‘‘देवा, आता मात्र पाऊस पाडलास तर बरे होईल. गव्हाचे चांगले पीक येईल.’’

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids story based on turkastani folktale
First published on: 18-12-2016 at 01:03 IST