केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसकडून या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर टीका केली गेली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माध्यमांशी बोलताना अर्थसंकल्पावर प्रतिक्रया दिली. केंद्र सरकारची महाराष्ट्रावर अन्यायाची परंपरा या अर्थसंकल्पातही कायम असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “देशाच्या अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. सर्व देशाचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष होतं. साहाजिक आम्ही विविध अर्थमंत्री आपआपल्या राज्याची जबाबदारी सांभाळत असतो आणि आमचं व आमच्या विभागाचंही त्याकडे बारकाईने लक्ष असतं. कारण, हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वेगेवगळी राज्या आपला अर्थसंकल्प पुढील महिन्यात किंवा मार्चमध्ये सादर करत असतात. मी साधारण बघितलं आगामी काळातील पाच राज्यांच्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून, काही निर्णय घेण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. शेवटी कुणीही अर्थसंकल्प मांडला? तर एक गोष्टा साधारणपणे आपल्याला पाहायला मिळते, की ज्या पक्षाच्या असणाऱ्या अर्थमंत्र्यांनी तो अर्थसंकल्प मांडला असताना, विरोधक त्यावर काहीना काही टीका-टिप्पणी करतच असतात. माझा स्वभाव तसा नाही, पण एक झालंय महाराष्ट्रावर या अर्थसंकल्पामुळे अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा ही यामध्ये देखील कायम दिसत आहे.”

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2022 deputy chief minister ajit pawars reaction to the union budget msr
First published on: 01-02-2022 at 18:38 IST