दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी भारत पेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सह संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांना भारत पेच्या विरोधात सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड ठोठावला. आपण पु्न्हा तसे करणार नाही, असे आश्वासन अश्नीर यांनी न्यायालयाला दिले होते. भारतपे विरोधात सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टबद्दल अश्नीर ग्रोव्हर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात माफीही मागितली आहे.

बार आणि बेंचच्या रिपोर्टनुसार, अश्नीर ग्रोव्हर यांच्या वर्तनामुळे न्यायालयाला धक्का बसला आणि त्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अनेक वादांमध्ये अडकलेल्या ग्रोव्हर यांनी भारतपेच्या अलीकडील सिरीज ई फंडिंग फेरीत सामील असलेल्या इक्विटी वाटप आणि दुय्यम घटकांबद्दल सोशल मीडियावर तपशील शेअर केला होता.

यानंतर भारत पेची मूळ कंपनी रेसिलिएंट इनोव्हेशन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक नवीन खटला दाखल केला आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आणि कंपनीशी संबंधित ‘गोपनीय माहिती’ असल्याचा दावा केला आहे, याचा खुलासा थांबवण्यासाठी मनाई आदेश मागितला. भारत पेच्या वकिलाने २४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात युक्तिवाद केला की, ग्रोव्हर यांच्या कृतीने त्यांच्या रोजगार करारामध्ये नमूद केलेल्या दायित्वांचे उल्लंघन केले आणि दावा केला की, त्यांनी कंपनीबद्दलची गोपनीय माहिती उघड केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या कायदेशीर कारवाई ही भारतपेद्वारे ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या दाव्याव्यतिरिक्त आहे. या प्रकरणात निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप करत ८८.६७ कोटी रुपयांपर्यंत नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. कथित फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांना गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) चौकशीला सामोरे जावे लागले.