मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांचा आशावाद आणि देशावरील त्यांच्या वाढत्या विश्वासामुळे भारतीय भांडवली बाजाराचे मूल्यांकन वाढले आहे, असे मत सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांनी मंगळवारी व्यक्त केले. भांडवली बाजाराचे किंमत-उत्पन्न गुणोत्तर अर्थात पीई रेशो हे २२.२ वर पोहोचले असून ते जगभरातील अनेक भांडवली बाजाराच्या निर्देशांकांच्या सरासरीपेक्षा अधिक आहे.

काही लोकांच्या मते भांडवली बाजारातील कंपन्यांच्या समभागांचे मूल्यांकन वाढले असून बाजार महाग झाला आहे. मत तरीही गुंतवणूक का येत आहे? कारण परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय भांडवली बाजारावर असलेल्या विश्वासाचे ते प्रतिबिंब आहे, असे बूच भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian capital markets are commanding higher valuations because of foreign investors trust print eco news asj
First published on: 03-04-2024 at 09:36 IST