नवी दिल्ली : सकारात्मक व्यावसायिक वातावरण आणि अनुकूल सरकारी धोरणाच्या जोरावर गेल्या नऊ वर्षांत कृषी आणि त्यासंबंधित क्षेत्रातील नवउद्यमींची (स्टार्टअप) संख्या सात हजारांहून अधिक झाली आहे, अशी माहिती ‘ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडियाज ॲग्रीकल्चर’ या अहवालातून समोर आली आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये देशात केवळ ५० कृषी आणि त्यासंबंधित क्षेत्रातील नवउद्यमी कार्यरत होत्या.

हेही वाचा >>> देशात दूरसंचार दर जगाच्या तुलनेत कमी : गोपाल विट्टल

infrastructure growth slips in august
पायाभूत क्षेत्रांच्या वाढीला घरघर; साडेतीन वर्षात पहिल्यांदाच नकारात्मक; ऑगस्टमध्ये उणे १.८ टक्क्यांपर्यंत अधोगती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
stock market, investing in stock market,
बाजार रंग : शास्त्र असतं ते! ‘थ्रिल’ नाही…
CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
ST Corporation in profit after nine years
नऊ वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात
government indicate extension of credit scheme for micro and small enterprises
सूक्ष्म, लघू उद्योगांच्या पतहमी योजनेला मुदतवाढीचे संकेत;  अतिरिक्त ५ लाख कोटींच्या तरतुदीचा केंद्राचा विचार

नऊ वर्षांत कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तो ३०,००० कोटींवरून १.३ लाख कोटींवर नेण्यात आला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून नवोपक्रम आणि कृषी-उद्योजकतेला चालना देण्यासाठी आर्थिक साहाय्य आणि प्रोत्साहन देऊन परिसंस्था उभी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न, कृषी विमा योजना आणि विस्तारित सिंचनापासून ते सेंद्रिय शेतीला चालना देणे, महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधांना चालना देणे आणि सेवांचे डिजिटायझेशन करणे यापासून सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांगीण धोरण स्वीकारले आहे,

हेही वाचा >>> ‘बचतदार ते गुंतवणूकदार गतिमान संक्रमण स्वागतार्हच’; अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून १० वर्षातील प्रगतीचे गुणगाण

प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनासारख्या प्रमुख धोरणात्मक उपक्रमांनी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष जावरे गौडा यांनी सांगितले.