|| श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील ‘सुरक्षा’ या घटकाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. सुरक्षा या विषयाची व्याप्ती मोठी आह. बा व अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी भारताला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. बा सुरक्षा म्हणजे परकीय राष्ट्राकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणापासून सुरक्षा करणे होय. अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमाअंतर्गत असणारी सुरक्षा, ज्यामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था व देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. भारतात अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयावर आहे तर बा सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्रालयावर आहे.

uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
Mehbooba PDP kashmir political parties
ओमर अब्दुल्ला मेहबूबा मुफ्तींवर का संतापले? पीडीपी जम्मू काश्मीरमध्ये पाच जागांवर लढणार
centre to consider revoking afspa withdrawing troops from Jammu and Kashmir says amit shah
जम्मू-काश्मीरमधून लष्कर, अफ्स्पा मागे घेण्याचा विचार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सूतोवाच  

दीर्घकालापासून जम्मू आणि काश्मीर हे राज्य दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांनी ग्रासलेले आहे. तसेच ईशान्येकडील राज्ये घुसखोरी व वांशिक चळवळी, संघटित गुन्हेगारी, सीमेपलीकडून अवैधरीत्या होणारी मादक पदार्थाची तस्करी इत्यादी समस्यांनी प्रभावित झालेली आहेत. सद्य:स्थितीमध्ये दहशतवाद आणि दहशतवादी कारवाया देशाच्या अनेक राज्यांमध्ये घडत आहेत. धार्मिक दंगे, भाषिक वाद, विविध राज्यांतर्गत असणारे वाद, नवीन तंत्रज्ञान अर्थात मोबाइल, इंटरनेट, समाजमाध्यमे, संकेतस्थळे यामुळे एखाद्या विशिष्ट द्वेषपूर्ण विचारसरणीचा प्रसार करणे यांसारख्या घटना घडत आहेत. अशा आव्हानात्मक समस्या देशातील विविधतेतील एकता आणि अखंडतेला बाधा पोहोचवत आहेत. यामुळे सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षेपुढे प्रचंड मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

सर्वप्रथम आपण सुरक्षाह्ण या घटकामध्ये नमूद असलेल्या मुद्दय़ांचा थोडक्यात आढावा घेऊ. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बा आणि अंतर्गत सुरक्षेसंबंधी मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यांमध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमांसंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी मादक पदार्थाची तस्करी आणि तिचे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा, माध्यमे आणि समाजमाध्यमे, संकेतस्थळे यांचा होणारा वापर याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला, सुरक्षिततेला निर्माण होणारे आव्हान इत्यादी बाबी आहेत. या आव्हानाला सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे, इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो. तसेच देशाची बा आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य, याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे याबाबत माहीत असणे आवश्यक आहे.

२०१३ ते २०१८ दरम्यान या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न.-

  • अवैध पसा हस्तांतरण देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी एक धोका आहे. भारतासाठी याचे काय महत्त्व आहे आणि या धोक्यापासून वाचण्यासाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे? (२०१३)
  • ‘‘भारताचे बहुधार्मिक आणि बहुवांशिक विविधतापूर्ण समाजस्वरूप हे शेजारील देशांमध्ये पाहावयास मिळणाऱ्या मूलतत्त्ववादी प्रभावापासून मुक्त नाही.’’ यासारख्या वातावरणाचा प्रतिकार करण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या रणनीतीसह चर्चा करा. (२०१४)
  • डिजिटल मीडिया यांसारख्या माध्यमातून धार्मिक उपदेशाच्या परिणामस्वरूप भारतीय युवक आई.एस.आई.एस (करकर) मध्ये सहभागी होत आहेत. आयसिस हे काय आहे आणि याचे ध्येय काय आहे? आयसिस हे आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला कशा प्रकारे धोका पोहोचवू शकते? (२०१५)
  • दुर्गम भूभाग आणि काही देशांसोबत असणाऱ्या शत्रूपूर्ण संबंधांमुळे सीमा व्यवस्थापन हे एक कठीण कार्य बनलेले आहे. प्रभावी सीमा व्यवस्थापन आणि रणनीतीवर प्रकाश टाका. (२०१६)
  • भारतात जमावाची हिंसा एक गंभीर कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या म्हणून उदयास येत आहे. योग्य उदाहरण देऊन यासारख्या हिंसेची कारणे आणि परिणामाचे विश्लेषण करा. (२०१७)
  • डावा उग्रवाद (Left Wing Extremism) यामध्ये उतरता कल (downward trend) दिसून येत आहे, पण अद्यापही देशाच्या अनेक भागांत याचा प्रभाव आहे. डाव्या उग्रवादामुळे (LWE) निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारत सरकारने अंगीकारलेल्या दृष्टिकोनाचे थोडक्यात स्पष्टीकरण करा. (२०१८)

याव्यतिरिक्त ‘डिजिटल सशस्त्र दलाची दला’ची आवश्यकता, चीन आणि पाकिस्तान आर्थिक माíगका आणि यामुळे भारताच्या सुरक्षेला असणारा धोका, समाजमाध्यमांवरील संकेतस्थळे, सायबर स्पेस आणि २०१३च्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण, दहशतवाद आणि पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरीची समस्या इत्यादी घटकांवरही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हे प्रश्न चालू घडामोडींचा संबंध जोडून विचारलेले आहेत. उपरोक्त प्रश्नांवरून असे दिसते की, या घटकाचे मूलभूत ज्ञान आपणाला आधी करून घ्यावे लागणार आहे. कारण प्रश्नामध्ये मूलभूत ज्ञानासह चालू घडामोडींशी सांगड घालून विश्लेषणात्मक तसेच समीक्षात्मक आकलनावर जोर देण्यात आलेला आहे. त्यामुळे विषयाच्या सर्वागीण माहितीचे आकलन केल्याशिवाय प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येत नाही. यावरून असे समजते की, सुरक्षा या घटकाची तयारी करताना देशाच्या अंतर्गत आणि बा सुरक्षेच्या समोर नेमकी कोणती आव्हाने आहेत?

यापासून देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला नेमका कोणता धोका आहे? आणि या आव्हानांना यशस्वीरीत्या परतवून लावण्यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? इत्यादी बाबींचा एकत्रितपणे विचार करून या घटकाची तयारी करणे अपेक्षित आहे. या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भ वापरावेत याचा आढावा आपण घेऊ. या घटकावर नोट्स स्वरूपातील अनेक गाइड्स उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासता येते. तसेच दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने दहशतवाद आणि नक्षलवाद या विषयावर सादर केलेले अहवाल पाहावेत.

या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ ही इंग्रजी दैनिके, योजना आणि वर्ल्ड फोकस ही मासिके आणि परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, IDSA यांच्या संकेतस्थळांचा वापर करावा.