फारुक नाईकवाडे

पूर्वपरीक्षेमध्ये सगळ्यात जास्त गुण असणारा घटक म्हणजे उताऱ्यावरील प्रश्न. साधारणपणे १० ते ११ उताऱ्यांवर एकूण ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतात. सर्वाधिक गुणांसाठी असणारा हा भाग सर्वाधिक वेळखाऊसुद्धा असतो. त्यामुळे याची तयारी आणि परीक्षा वर्गामधील वेळेचे नियोजन या बाबी अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी
how to choose career after 12th
बारावीची परीक्षा तर संपली, ‘मग आता पुढे काय?’ करिअर निवडण्याआधी ‘या’ गोष्टी पाहा…

हा घटक पूर्वपरीक्षेत सन २०१३ पासून तर मुख्य परीक्षेत सन २०१७पासून वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट झाला आहे. हा भाग समाविष्ट करण्यामागे उमेदवारांच्या आकलनाची परीक्षा घेण्याचा आयोगाचा हेतू आहे.

दिलेला उतारा उमेदवारांनी कमीतकमी वेळेत समजून घेऊन त्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे यामध्ये अपेक्षित आहे. एका अर्थाने उतारे हा उमेदवारांच्या वाचन आणि आकलनाची परीक्षा असतो. आकलनाशिवाय वेगाने वाचन सोपे

आहे, मात्र आकलन करत वाचणे हा वेळ खाणारा प्रकार आहे. आकलनासहित वाचनाचा वेग वाढवण्यासाठी सराव खूप आवश्यक आहे.

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उमेदवारांच्या अनुभवाचे विश्लेषण केले तर या विषयाच्या तयारीमध्ये पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

* दिलेला उतारा उमेदवार पहिल्यांदाच वाचत आहे हे प्रश्नकर्त्यांला माहीत असते त्यामुळे विनाकारण गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जात नाहीत.

*  परीक्षा वर्गामध्ये आपल्याला उताऱ्याचा अभ्यास करायचा नाही तर प्रश्नांची उत्तरे देऊन गुण मिळवायचे आहेत हे मनामध्ये पक्के नोंदवून घ्यायला हवे. आपल्याला प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित सापडत असेल तर उतारा संपूर्णपणे कळला नसेल तरी हरकत नसते. अर्थात प्रश्न वाचून त्यांची उत्तरे शोधली आणि काम झाले असा कोणताही उतारा सहज सोपा नसतो. तो ढोबळमानाने तरी समजलाच पाहिजे.

*  कमी वेळेत उतारा समजून घ्यायच्या तणावामध्ये एकाग्रतेने आणि वेगाने उतारा वाचणे आव्हानात्मक वाटते आणि वेळेचे नियोजन आणि मार्काचे गणित दोन्ही कोलमडते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उतारे वाचणे आणि सोडवण्याचा सराव अत्यंत आवश्यक आहे.

*  बऱ्याच वेळा उताऱ्यातील त्या त्या विषयाशी संबंधित अवघड पारिभाषिक शब्दांमुळे किंवा उताऱ्याचा टोन उपरोधिक किंवा तिरकस असल्यामुळे उमेदवारांना उताऱ्याचे आकलन होण्यात अडचणी येतात. बहुतांश वेळा मराठीतूनच उतारा वाचण्याचा उमेदवारांचा कल असतो. पण यामुळे पर्यावरणविषयक किंवा काही विज्ञानविषयक माहितीवरील उतारे वाचून समजण्यास जास्त वेळ लागतो. अशा उताऱ्यांमध्ये जर पारिभाषिक संज्ञा जास्त असतील आणि तथ्यात्मक प्रश्न जास्त विचारले असतील तर असे उतारे इंग्रजीतून वाचल्यास वेळेची बचत होऊ शकते.

* काही वेळा उताऱ्याच्या पहिल्या काही ओळी वाचून तो अवघड वाटल्याने आत्मविश्वास कमी होतो. आणि त्यामुळे त्यावरील प्रश्न फारसे आव्हानात्मक नसले तरी अवघड वाटू लागतात. एखादा उतारा नाही समजला आणि त्यावर तथ्यात्मक माहिती विचारली असेल तर तो बोनस घ्यायलाच हवा.

*  प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून दिसते की, संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न हे प्रबोधन, लेखकांचे व्यक्तिगत अनुभव, वेगळ्या विषयांवर आधारित उताऱ्यांवर विचारण्यात येतात. त्यामुळे अशा विषयांचे उतारे लोकसत्ता, साधना मासिक अशा स्रोतांतून वाचणे आणि तयारीच्या वेळी ते व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे उतारे समजून घ्यायचा सराव झाला की परीक्षा वर्गामध्ये कमीतकमी वेळेमध्ये त्यांचे आवश्यक आकलन होण्यास मदत होते.

* तथ्यात्मक माहिती, पारिभाषिक संज्ञांचा समावेश असलेल्या उताऱ्यांवर सरळ प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे हे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते. असे उतारे आधी प्रश्न पाहून वाचत गेल्यास शक्य तेथे प्रश्नानुसार आवश्यक माहिती अधोरेखित करत उतारा वाचन करणे शक्य होते आणि विद्यार्थ्यांचा उत्तरे देण्याचा वेळ कमी होतो.

* मराठी आकलनासाठी तिरकस, उपरोधिक आणि तत्त्वचिंतनपर अशा विषयांवरील साहित्य वाचण्याचा सराव आवश्यक आहे.

* इंग्रजी आकलनासाठी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’मधील संपादकीय, विज्ञान व अर्थव्यवस्थेबाबतचे लेख वाचून ते समजून घेण्याचा सराव आवश्यक आहे. त्याचबरोबर शब्दसंग्रह वाढविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करायला हवा. याचा फायदा कायमस्वरुपी होणार आहे.

* वाचनाचा वेग आणि आकलन वाढविण्याचा प्रयत्न करणे या घटकाच्या तयारीसाठीच नाही तर एकूण अभ्यासामध्येही अत्यंत महत्त्वाचे आहे. नुसते वाचन आणि आकलनासहित वाचन यांमध्ये गुणवत्ता आणि आवश्यक वेळ दोन्हीतही फरक असतो. त्यासाठी सुरुवातीपासूनच आकलनासहित वाचनाची सवय लावून घ्यायला हवी.

पारंपरिक आकलनाच्या पद्धतीमध्ये प्रश्नांची स्वत:च्या भाषेत उत्तरे लिहून आपले कौशल्य दाखविण्यास वाव असतो. पण वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये दिलेल्या पर्यायांमधून उत्तरे शोधताना नेमकेपणा आणि प्रश्नकर्त्यांला अपेक्षित उत्तराचा अंदाज बांधणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे वाचन आणि त्यातून नेमके आकलन याचा सराव या घटकामध्ये जास्तीतजास्त गुण मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.