विक्रांत भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या लेखात आपण भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. यूपीएससीने दिलेल्या मुख्य परीक्षेतील चौथ्या पेपरमधील हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो ज्या अतिशय ‘बुद्धिमान’ आणि ‘हुशार’ असतात, मात्र आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी ‘बुद्धिमत्ता’ असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. या आणि अशा अनेक वेगवेगळय़ा घटनांमधून आपणास हे पाहता येते की, ‘बुद्धिमान’ व्यक्ती ही ‘यशस्वी’ व्यक्ती असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या अपयशाचे गमक हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळय़ाच घटकांशी संबंधित असते. हा घटक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे – व्यक्तीने भावनिक असणे आणि भावनिकदृष्टय़ा बुद्धिमान असणे या दोन संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. अनेकदा हा फरक बारकाईने लक्षात घेतला जात नाही. भावनिक बुद्धिप्रामाण्याच्या अभ्यासाचे मूळ आपल्याला डार्विनच्या सैद्धांतिक कामामध्ये आढळून येते. डार्विनने हे सर्वात प्रथम मांडले की, भावनिकरीत्या व्यक्त होता येणे हे तग धरून ठेवण्यासाठी (Survival) आवश्यक असते.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc emotional intelligence in the exam students ysh
First published on: 25-10-2022 at 00:02 IST