– डॉ. मिलिंद आपटे
● मला दहावी मध्ये ७० गुण आहेत. बारावीत ५६ गुण आहेत. मी बीई मेकॅनिकल इंजिनीअरिंग या चालू वर्षात पूर्ण केली आहे. मला बीई ला ७० गुण आहेत. मला राज्यसेवा मराठी मधून द्यायची आहे. त्यासाठी मी कशा पद्धतीने अभ्यास करावा?
– तुषार शेळके
तुषार, उमेदवार एमपीएससी परीक्षेसाठी इंग्रजी किंवा मराठी यापैकी एकाची निवड करू शकतात. तथापि, जर उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी निवडले गेले तर मराठी भाषेचा पेपर अनिवार्य असेल. सर्वात प्रथम राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे मन लावून वाचन करावे. मागील कमीत कमी दहा वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे संकलन आणि वाचन., प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अध्ययन साहित्य जमवणे, अभ्यास नियोजन, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे. बाजारात उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक साहित्यावर अवलंबून न राहता विषयांची संदर्भ पुस्तके वाचणे उत्तम. जसे विज्ञान, भूगोल या विषयांसाठी आठवी ते दहावीपर्यंतच्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वाचन प्रत्येकाने आपल्या वाचनाचा, पाठांतराचा वेग लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे. ठरावीक दर्जेदार पुस्तकांचीच उजळणी करणे उत्तम. सुरुवातीला प्रत्येक घटकाचे प्राथमिक वाचन करावे. मग द्वितीय वाचन शांतपणे करावे. यात न समजलेला भाग अधिक चांगल्या पद्धतीने वाचण्यावर भर द्यावा.
● माझे वय २५ वर्ष आहे. मी सध्या पोलीस भरती आणि सरळ सेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. मला दहावी ला ७६.२० टक्के व बारावी विज्ञान ५२ टक्के आहेत. पदवी कला शाखेतून पूर्ण झाली आहे व पदवीला सीजीपीए ७.२४ आहे. आतापर्यंत आर्मी भरती पासून ते पोलीस भरती पर्यंत खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. प्रयत्नसुध्दा खूप करत आहे. या सर्व प्रयत्नात ५ ते ६ वर्ष कशी निघून गेली. प्लान बी नसल्या कारणाने मनात नको ते नकारात्मक वाईट विचार येतात. कृपया मला मार्गदर्शन करावे.
— सुमित परळे
सुमित, अशा परिस्थितीत मी समुपदेशकला भेटण्याचा सल्ला देतो, कारण थोडं आत्मबळ मिळणे हे गरजेचे असते. असो, माझ्या परीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, तुमचे एकूण शिक्षण बघता तुम्ही चांगले विद्यार्थी आहात असे दिसते, पण सध्याच्या अपयशाची कारणे शोधणे हे आता गरजेचे आहे, प्लान बी साठी बोलायचे म्हणजे इतर स्पर्धा परीक्षांना प्रयत्न करणे तसेच ध्येयानुसार प्रयत्न करणे सुरू ठेवावे. बाकी अजून काय तुमचे कौशल्य आहे त्यानुसार थोडी दिशा बदलण्यास हरकत नाही., धावणे रोज एक तास जरूर करा. करत असल्यास सातत्य ठेवा. त्यामुळे नकारात्मक विचार कमी होतील. खूप शुभेच्छा
● सर, माझे प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत उर्दू माध्यमातून झाले. त्यानंतर मी दहावीपर्यंत मराठी शाळेत होतो. दहावीला मला ७३ टक्के गुण मिळाले व नंतर मी अकरावी बारावीला सायन्स घेऊन ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो नंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे जायचा विचार होता त्यामुळे बीएला प्रवेश घेतला. व स्पेशल इकॉनॉमिक्स विषय घेऊन पदवी घेतली.आता मी औरंगाबादला स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. माझी कम्बाईनची बॅच आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कइढर आणि ळउर हे दोन कंपन्या सरळ सेवेचे परीक्षा घेत आहे तर मी सरळ सेवेची तयारी करत आहे. मी सर्व सेवेची तयारी चालू ठेवू की एमपीएससीच्या अभ्यासाला लागू यात मला संभ्रम निर्माण होत आहे.
– मनियार इकरमा राजमोहम्मद
– सर्व सेवेची तयारी चालू ठेवू की एमपीएससीच्या अभ्यासाला लागू यात मला संभ्रम निर्माण होत आहे हा तुमचा प्रश्न आहे. IBPS आणि TCS हे दोन कंपन्या सरळ सेवेचे परीक्षा घेत आहे, याचा निकाल तसा लवकर मिळतो. त्यामुळे खूप विचार न करता दोन ही परीक्षांची तयारी करा. तुमचे वय कळवले नाहीत ते माहिती झाले तर अजून नेमका निर्णय देता येईल
careerloksatta@gmail.com