जयप्रकाशजींनी ‘संपूर्ण क्रांती’ची घोषणा केली.. विविध संघर्षांत देशातील अस्वस्थ तरुण वर्ग लोंढय़ांनी सामील झाला, त्यात तरुण मुलींचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर होता हे विशेष. जयप्रकाशजींनी चळवळीला दिलेल्या नैतिक बैठकीमुळे या चळवळीतून असंख्य स्त्री-पुरुष कार्यकर्ते निर्माण झाले, हे या चळवळीचे मोठेच यश. नंतर आलेल्या आणीबाणीच्या संकटाला तोंड देण्यासाठीची जणू ही पूर्वतयारीच होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवनिर्माण आंदोलनाआधीची परिस्थिती लक्षात घेतली, तर १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्धात खंबीर भूमिका निभावली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे वर्णन ‘दुर्गा’ असे केले होते. परंतु त्यानंतर त्यांचे रूप पालटले. त्यांनी अधिकारांचे केंद्रीकरण सुरू केले. त्यामुळे लोकसभेत आणि बाहेरही त्यांच्याविरोधी वातावरण तयार झाले. पाकिस्तानशी झालेल्या युद्धामुळे महागाई प्रचंड वाढली होती, त्यात १९७२च्या भयंकर दुष्काळाची भर पडली. महागाई, टंचाई, दुष्काळ यांनी जनतेच्या मनात मोठा असंतोष माजला होता. इंदिरा गांधींचे न्यायालय आणि कायदेमंडळ यांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याविरुद्ध लोक मोठय़ा प्रमाणावर बोलू लागले होते. इंदिरा गांधींच्या भ्रष्ट सरकारवर मधू लिमये आणि जॉर्ज फर्नाडिस यांनी टीकास्त्र चालवले होते.

मराठीतील सर्व लढा, चळवळी, आंदोलनं बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Role of womens in indias sturggle for freedom
First published on: 11-06-2016 at 01:16 IST