भारतात आजच्या घडीला सुमारे ५ कोटी लोकांना मधुमेह आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत मधुमेह हे मृत्यूच्या कारणांपैकी सातवे महत्त्वाचे कारण असेल. म्हणूनच आत्तापासून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे, त्यासाठीच यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे बोधवाक्य आहे, ‘उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा!’
जगात एका मोठय़ा प्रमाणावर वाढणाऱ्या आरोग्य स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने २०१६ च्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य दिले आहे, ‘उत्कृष्ट राहा : मधुमेहावर मात करा आणि त्याचे वाढणारे प्रमाण रोखा’  (Beat Diabetes and halt the Rise) ही हाक जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगासाठी दिली असली तरी भारताने त्याकडे खूप गंभीरपणे पाहायला पाहिजे. कारण भारतातील त्याचे प्रमाण जास्त वेगाने वाढते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरामध्ये आज ३५ कोटी लोकांना मधुमेह आहे, जी संख्या येत्या वीस वर्षांमध्ये दुपटीपेक्षाही जास्त होऊ शकते. २०१२ मध्ये जगात १५ लाख लोकांचा मृत्यू मधुमेहामुळे झाला. २०१४ मध्ये जगभरातील अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ९ टक्के लोकांना मधुमेह होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत मधुमेह हे मृत्यूच्या कारणांपैकी सातवे महत्त्वाचे कारण असेल.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be perfect to overcome diabetes
First published on: 02-04-2016 at 01:09 IST