वैचारिक मतभेद आहेत, असं सांगत आज अनेक जोडपी वेगळी होताना दिसत आहेत. खरंच हे मतभेद तेवढे टोकाचे असतात का की उसवलेला धागा पुन्हा घट्ट करताच येऊ नये. नवरा-बायकोच्या नात्यात विभक्त होणं शक्य असतं परंतु त्यात मनाची, आरोग्याची पडझड होतेच. महत्त्वाची वर्षे वाया जातात. आणि पुन्हा दुसरा नातेसंबंध जोडायचं ठरवलं तरी त्यात सुख मिळेल याची काय खात्री? त्यापेक्षा पहिल्या नात्यातलं आपल्या दु:खाचं ओळखीचं गाठोडंच आपण उचलायचं ठरवलं, आपल्याच दु:खाचं कारण शोधलं तर किती तरी आयुष्य सुखी होतील.. फक्त प्रयत्न करायला हवा..
कुठेतरी एक गोष्ट वाचलेली आठवतेय.. एकदा काही माणसे स्वर्गात जातात. प्रत्येकाच्या पाठीवर त्याच्या त्याच्या दु:खाचं एक गाठोडं असतं. काही मोठी काही छोटी. ते सगळे जण चित्रगुप्ताकडे जातात आणि तक्रार करतात की तू आम्हाला किती दु:ख दिलंस. कंटाळा आलाय या दु:खांचा. त्यांना चित्रगुप्त म्हणतो, ‘‘सगळ्यांनी आपापली दु:खाची गाठोडी ठेवा तिथे कोपऱ्यात.. आणि या बघू मस्त चक्कर मारून. बघा तरी स्वर्ग आहे कसा..’’ सगळे जण आपापली गाठोडी ठेवतात आणि जातात. बराच वेळ इकडे तिकडे फिरून स्वर्गातलं सुखद वातावरण पाहून आनंदी मनाने परततात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रगुप्त म्हणतो , ‘‘तुम्हा सगळ्यांना फक्त सुख देणं हे काही माझ्या हातात नाही. पण माझ्या हातात एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती म्हणजे तुम्ही तिथे ठेवलेली जी दु:खाची गाठोडी आहेत त्यातलं कोणतंही गाठोडं उचलू शकता. लहान-मोठं तुम्हाला जे हवं ते. सगळ्यांना सुरुवातीला खूप आनंद झाला. पण क्षणभरानंतर प्रत्येक जण विचारात पडला आणि शेवटी सगळ्यांनी आपापली गाठोडीच उचलली. चित्रगुप्त मनोमन हसला पण वरकरणी त्यांना म्हणाला, ‘‘अरे असं का केलं सगळ्यांनी?’’
सगळे म्हणाले, ‘‘आम्हाला आमच्या दु:खांची ओळख आहे. इतरांची दु:खे आमच्यासाठी नवीन आहेत. ती कशी हाताळायची हे आम्हाला माहीत नाही. त्यापेक्षा आमचीच दु:खं आम्हाला बरी.’’ असं म्हणून सगळ्यांनी आपापली गाठोडी घेऊन परत एकदा पृथ्वीवर प्रयाण केलं.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strain in relationships
First published on: 30-01-2016 at 01:18 IST