तुमची समस्या सोडवणं म्हणजे बौद्धिककदृष्टय़ा तुमचं समाधान करेल असं काहीतरी उत्तर देणं; आणि तुमची समस्या नाहीशी करणं म्हणजे मुळात समस्या अशी काही गोष्ट नाहीच याची जाणीव तुम्हाला करून देणं. समस्या या मुळात आपली स्वत:ची निर्मिती असते आणि त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याची काही गरजच नसते. ज्ञानाचा स्पर्श झालेल्या जागरूकतेला उत्तर नसतं. तिचं सौंदर्य म्हणजे तिच्यात प्रश्नच नसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिचे सगळे प्रश्न विरघळून गेलेले असतात, नाहीसे झालेले असतात. लोक याच्या उलट विचार करतात. त्यांना वाटतं की ज्ञानी माणूस म्हणजे त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असलीच पाहिजेत. प्रत्यक्षात त्याच्याकडे कोणतंच उत्तर नसतं. मुळात त्याला प्रश्नच पडत नाही. आणि प्रश्न पडले नाहीत, तर उत्तराचा संबंध येतो कुठे?

मराठीतील सर्व ओशो म्हणे.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article from book osho the path of mystic by osho
First published on: 20-10-2018 at 01:01 IST