किरकोळ भांडणामुळे एका व्यक्तीने क्रुरतेने पत्नी आणि तीन चिमुकल्यांची हत्या करून स्वत:ही गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डीएनएच्या रिपोर्टनुसार, अलाहाबादच्या धूमनगंज परिसरातील पीपल गावमध्ये मनोज कुशवाह (३५) यांने आपल्या कुटुंबातील चार जणांची हत्या करत स्वत:ही जीवन संपवले. मनोज कुशवाह याने पत्नी श्वेताला (३०) मारल्यानंतर त्याने तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर चाकूने वार करत प्रिती (८), शिवानी (६) आणि श्रेया (३) या तिन्ही मुलीचे आयुष्य संपवले. एका मुलीचा मृतदेह बॉक्समध्ये ठेवला, तर दुसऱ्या मुलींचा मृतदेह कपाटात लपवून ठेवला आणि तिसऱ्या मुलीला मारुन जमिनीवरच ठेवलं. त्यानंतर स्वत: पंख्याला लटकून गळफास घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उशीर झाला तरी कोणी दरवाजा उघडत नाही. कोणी बाहेर येत नाही पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये घरगुती वाद झाला होता, तो वाद चौघींची हत्या आणि आत्महत्यापर्यंत पोहोचला, अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे. पोलिस परिसरातील नागरिकांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यानंतर ही हत्या आणि आत्महत्या आहे की, बाहेरच्या कोणा व्यक्तीचा या घटनेत हात आहे, हे स्पष्ट होईल

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allahabad shocker man kills wife daughters hangs himself after murder
First published on: 22-08-2018 at 12:57 IST