अमृतसरच्या चौडा बाजार परिसरात दसरा असल्याने रावण दहन आयोजित करण्यात आले होते. रावण दहन सुरु असतानाच एक ट्रेन मोठ्या वेगात या ठिकाणी आली. ज्या घटनेत ५० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होते आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर काटा अाणणारा हा व्हिडीओ आहे.

सध्या या मैदानात अनेक लोकांचा आक्रोश पाहायला मिळतो आहे. अत्यंत भीषण असा हा अपघात आहे. लोक संतापलेले आहेत, रडत आहेत आपल्या माणसांना शोधत आहेत. आपण त्याची फक्त कल्पना करू शकतो. ५० पेक्षा जास्त लोक मरण पावले असल्याची भीती व्यक्त होते आहे. अत्यंत वेगात ट्रेन आली आणि ती निघून गेली. या भीषण अपघातात ६० ते ७० लोकांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.