गुवाहाटी : आसाममधील भबानीपूरचे आमदार पाणीधर तालुकदार यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. आपल्या मतदार संघातील लोक गरीब असून त्यांचा फायदा व्हावा, मतदार संघाचा विकास करता यावा, यासाठी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा दावा त्यांनी केला. विकासासाठी सत्ताधारी पक्षासोबत मिळून काम करायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार असूनही विरोधी पक्षात असल्याने आतापर्यंत मतदार संघातील गोरगरीब लोकांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यासोबत काम करण्यासाठी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रं ट सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.