केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’वर भर देत काही महत्वाच्या घोषणा केल्या.

– सरकार शस्त्रास्त्रांची एक यादी तयार करुन मुदतबद्ध पद्धतीने शस्त्रास्त्रांची आयात बंद करणार.

– त्याचवेळी सैन्याला लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती भारतातच करण्यावर भर देणार.

– या उपायोजनांमुळे आयातीचे मोठे बिल कमी होईल.

– संरक्षण क्षेत्रात स्वायत्तता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

– संरक्षण उत्पादन क्षेत्रातील परकीय गुंतवणूक म्हणजे एफडीआयची मर्यादा ४९ वरुन ७४ टक्क्यापर्यंत वाढवण्यात आली आहे.

– मुदतीमध्ये संरक्षण खरेदी आणि वेगवान निर्णय प्रक्रियेसाठी सरकार प्रकल्प व्यवस्थापन युनिटची स्थापना करणार.