छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून, दहा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. #UPDATE | Five security personnel died & around 10 others injured in an exchange of fire with Naxals in jungles near Tarrem, Bijapur, says Chhattisgarh DGP DM Awasthi pic.twitter.com/RPqbBRZhbE — ANI (@ANI) April 3, 2021 या अगदोर छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात पाच पोलीस शहीद झाले, तर १४ जण जखमी झाले होते. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच पोलीस शहीद जिल्हा राखीव पोलीस दलातील २० कर्मचारी मंगळवारी नक्षलवादविरोधी मोहीम आटोपून खास बसद्वारे नारायणपूरकडे परतत होते. कदेनार आणि कान्हरगावदरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटाद्वारे ही बस उडवली. त्यात चालकाबरोबरच पाच पोलीस शहीद झाले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक (बस्तर परिमंडळ) सुंदरराज पी. यांनी दिली.