जर भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर संदेश द्यायचा असेल तर भारत नक्कीच पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो असा विश्वास निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी व्यक्त केला आहे. नियंत्रण रेषा पार करुन दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व हुडा यांनीच केलं होतं. एएनआयशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी यावेळी बोलताना माहिती दिली की, ‘२०१६ मध्ये दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक करण्याच निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता, ज्याला लष्कराने संमती दर्शवली अशी माहिती दिली’.

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
Twinkle Khanna reacts on performing in Dawood Ibrahim party
ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

२९ सप्टेंबर २०१६ रोजी करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचं व्हिडीओ फुटेज सार्वजनिक करण्यात आलं असून यामध्ये कशाप्रकारे लष्कराने नियंत्रण रेषा पार करुन दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे हे सविस्तर दिसत आहे. ड्रोन आणि युएव्हीच्या सहाय्याने हे फुटेज रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

डी एस हुडा यांनी सांगितल्यानुसार, पाकिस्तानी लष्कराची ठिकाणं जवळ असल्याने कारवाईदरम्यान हे खूप मोठं आव्हान होतं. रेकॉर्ड होत असलेलं सर्व फिड थेट दिल्लीलाही पोहोचत होतं. जवळपास सहा तासांसाठी ऑपरेशन सुरु होतं. मध्यरात्री पहिल्या टार्गेटला लक्ष्य करण्यात आलं तर सकाळी सव्वा सहा वाजता शेवटचं टार्गेट लक्ष्य कऱण्यात आलं.