ओदिशातील मलकानगिरी येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळी आता शोधमोहीम सुरु असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

मलकानगिरीतील कालीमेडा येथे सोमवारी पहाटे नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीबाबत सुरक्षा दलांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, नक्षलग्रस्त भागात आता चकमकीचे प्रमाणही वाढले आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले होते. तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचाही खात्मा करण्यात आला होता.