भारताच्या विरोधातील ठराव पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांनी केला असून त्यात त्यांच्या दोन सैनिकांना सीमा सुरक्षा दलाने गोळीबारात ठार केल्याचा निषेध केला आहे. सर्वपक्षीय परिषद इस्लामाबाद येथे झाली त्यात मूळ विषय हा दहशतवादाशी निगडित घटनांमध्ये सामील असलेल्या अतिरेक्यांचे खटले निकाली काढण्यासाठी लष्करी न्यायालये स्थापन करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली, परंतु नंतर ३१ डिसेंबरला पाकिस्तानच्या दोन रेंजर्सला भारताने ठार केल्याच्या घटनेची गंभीर नोंद घेण्यात आली असून त्याचा निषेध करीत आहोत असेही म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे कृत्य हे भ्याड व अनैतिक आहे व त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेल्या लष्करी संकेतांचे उल्लंघन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2015 रोजी प्रकाशित
पाकिस्तानचा भारतविरोधी कांगावा
भारताच्या विरोधातील ठराव पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांनी केला असून त्यात त्यांच्या दोन सैनिकांना सीमा सुरक्षा दलाने गोळीबारात ठार केल्याचा निषेध केला आहे.
First published on: 04-01-2015 at 08:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan allegations of breach of trust as border firing intensifies