“मंत्री होऊनही किंवा आमदार होऊनही जे नेते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत आणि त्यांचे प्रश्न सोडविणार नाहीत, त्यांना येत्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उमेदवारी देणार नाही. कार्यकर्ते पक्षाचा कणा असतो त्यांचा आदर म्हणजे जनतेचाच आदर असतो. तो नेत्यांनी राखलाच पाहिजे.”
राहुल गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्ष

“जातीयवादी शक्ती २०१४ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून या देशाचा निधर्मी पाया खच्ची करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचे प्रतिबिंब देशाच्या काही भागांत  उसळलेल्या दंगलीतून उमटले आहे. या शक्ती अधिकच आक्रमक होत आहेत.”
प्रकाश करात, सरचिटणीस, माकप