पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश खड्डयात घातला, निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा हेच लोक पैसे वाटायला येत आहेत. पैसे द्यायला आले तर घ्या, कारण ते तुमचेच पैसे आहेत. त्यानंतर या लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारा आणि हाकलून द्या. मोदी आणि शाह यांना घालवायचे म्हणून काळजावर दगड ठेवून मतदान करा असं आवाहन राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलं.

नरेंद्र मोदींना देशाने खूप चांगली संधी दिली होती. या संधीचं सोनं नरेंद्र मोदींना करता आलं असतं, मात्र ते त्यांना करता आलं नाही. मोदी आणि शाह या दोघांनीही थापा मारल्या आता या दोघांनाही हटवण्याची वेळ आली आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. नोटबंदीनंतर देशात ४कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या,९९.३%पैसे बँकेत परत आले. म्हणजे नोटबंदी ही अपयशी ठरली.त्यावेळी मोदी म्हणाले होते की जर ५० दिवसात सगळं सुरळीत नाही झालं तर मला कोणत्याही चौकात उभं करा आणि मला हवी त्या शिक्षा द्या. मोदी तुम्ही चौक ठरवा आता,शिक्षा द्यायला आम्ही येतो असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.