पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यांनी खूप मोठी चूक केली असून त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. एकाही दहशतवाद्याला सोडलं जाणार नाही असं सांगताना सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी हल्ल्यानंतर जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा इशारा दिला होता. शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांनी शहिदांना आदरांजली वाहत पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाव न घेता इशारा दिला आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. हल्ल्यामागे जी ताकद आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल असा इशारा मोदींनी दिला. PM Modi on #PulwamaAttack : The forces behind this act of terrorism & those responsible for it, will be definitely be punished. pic.twitter.com/ucSXnB9BvO — ANI (@ANI) February 15, 2019 आज प्रत्येक भारतीय शहीदांच्या कुटुंबीयांसोबत आहे. देशात आक्रोश आहे, लोकांचा रक्त उसळत आहे हे मला कळत आहे. काहीतरी केलं पाहिजे ही भावना स्वाभाविक आहे असं यावेळी नरेंद्र मोदींनी म्हटलं. लष्कराच्या शौर्यावर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचं सांगताना योग्य माहिती सुरक्षा यंत्रणापर्यंत पोहोचवावी जेणेकरुन दहशतवादाविरोधातील लढाई अजून तीव्र करता येईल असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. PM Modi: I thank all the nations who have supported us and condemned this incident in the strongest of terms. A strong reply will be given to this attack. #PulawamaTerrorAttack pic.twitter.com/pNlwwANKsu — ANI (@ANI) February 15, 2019 ही वेळ संवेदनशील आणि भावनात्मक आहे. आपण सगळ्यांनी राजकारणापासून दूर राहावं असंही आवाहन यावेळी मोदींनी केलं. देश एकजूट होऊन सामना करत आहे. देश एकत्र असून हाच आवाज देशभरात ऐकू गेला पाहिजे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. जे कट रचत आहेत, त्यामुळे भारतात अस्थिरता निर्माण होईल असं वाटत असेल तर हा विचार सोडून द्या. कधी करु शकणार नाही आणि होणारही नाही असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. PM Narendra Modi: If our neighbour which is totally isolated in the world thinks it can destabilise India through its tactics and conspiracies, then it is making a big mistake #PulwamaTerrorAttack pic.twitter.com/0GdB3scaCi — ANI (@ANI) February 15, 2019 अनेक देशांनी अत्यंत कडक शब्दांत निषेध नोदवला असून भारतासोबत असल्याचं जाहीर केलं आहे असं सांगत मोदींनी त्यांचे आभार मानले. दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. जेव्हा सर्व देश एका दिशेने प्रवास सुरु करतील तेव्हा दहशतवाद टिकणार नाही असं मोदींनी म्हटलं. शेजारच्या देशांचे मनसुबे कधी पूर्ण होणार नाहीत. त्यांचा मार्ग विनाशाचा आपण प्रगतीच्या वाटेवर आहोत असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.