डाव्या आघाडीच्या नेत्यांसोबत शनिवारी एका व्यासपीठावर आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष व काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ‘हुकुमशाही’ राबवत असल्याचा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, की भ्रष्टाचाराची बजबजपुरी झालेल्या राज्यात तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी आपल्या पक्षाने डाव्या आघाडीशी हातमिळवणी केली आहे. त्यापूर्वी नियामतपूर येथील सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढविला. देशातील लोकशाही चिरडण्याचा मोदी यांचा प्रयत्न असून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये पुनरावृत्ती करीत असल्याचे म्हणाले.