आंध्र प्रदेशला लवकरात लवकर विशेष वर्गवारीचा दर्जा द्यावा, अशी विनंती काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे. आंध्र प्रदेशला लवकरात लवकर विशेष वर्गवारीचा दर्जा द्यावा आणि आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ मध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची कालबद्ध पद्धतीने पूर्तता करावी, अशी विनंती गांधी यांनी पत्रात केली आहे.
विभाजित राज्याची राजधानी असलेल्या अमरावतीचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यासाठी पंतप्रधान २२ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशात येणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर गांधी यांनी सदर पत्र पाठविले आहे.