राजस्थानमधील काँग्रेस सरकार महाराष्ट्रातील त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा पाहुणचार करण्यात गुंतलेले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचा त्यांना विसर पडला आहे, अशी टीका भाजप नेते अरुण चतुर्वेदी यांनी केली आहे.

शुक्रवारपासून महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार जयपूरमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. राज्य सरकार त्यांच्या सरबराईत मग्न असल्याचा भाजपचा आरोप आहे. राज्यातील राजकारणात अनिश्चितता असताना काही आमदारांनी पुष्कर व अजमेर तसेच जयपूर येथे पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. सोमवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या आमदारांसाठी मेजवानी आयोजित केली होती.