भारतात लोकसंख्येत निर्माण होणारा असमतोल टाळण्यासाठी हिंदूंनी यापुढे ‘तीन अपत्ये’ होऊ द्यावीत, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदूंना दिला आहे. येथे सुरू असलेल्या संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत धोरण म्हणून या मुद्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सत्ताधारी संपुआ सरकारची हाकलपट्टी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मतदान होईल असे पहाणे गरजेचे आहे असेही संघआच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी यांनी दिली.
भारतात लोकसंख्येत मोठ्ठी स्थित्यंतरे होत आहेत. येथील अल्पसंख्यांची संख्या वाढत असून त्यांना लोकसंख्येत वरचष्मा मिळू नये यासाठी हिंदूंनी यापुढे ‘तीन अपत्यां’चे धोरण अवलंबावे, असे संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सुचविण्यात आले. विकासासाठी समतोल गरजेचा आहे. कुटुंब नियोजनाची जबाबदारी देशातील एकाच विशिष्ट व्यक्तिसमूहावर टाकून चालणार नाही, तर लोकसंख्येचा तोलही सांभाळला जायला हवाच, असे मत या बैठकीत पुढे आले.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…