उत्तर प्रदेशच्या लोकांशिवाय मुंबईचा एकही चित्रपट चालू शकणार नाही, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. तसेच उत्तर प्रदेशकडे देशाचा पंतप्रधान ठरवायची ताकद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दिल्लीत पंतप्रधानपदी कोण बसणार याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या सहमतीशिवाय होणे अशक्य असल्याचे अखिलेश यांनी म्हटले.