scorecardresearch

Premium

ऑस्करसाठी भारताकडून ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’

२०१८ मध्ये केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीवर आधारित ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या मळय़ाळम चित्रपटाची निवड ‘ऑस्कर पुरस्कार-२०२४’साठी भारतातर्फे अधिकृतपणे करण्यात आली आहे.

2018 movie entry in oscar award
ऑस्करसाठी भारताकडून ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’

पीटीआय, चेन्नई : २०१८ मध्ये केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीवर आधारित ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या मळय़ाळम चित्रपटाची निवड ‘ऑस्कर पुरस्कार-२०२४’साठी भारतातर्फे अधिकृतपणे करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट महामंडळाने (फिल्म फेडरेशन) बुधवारी याबाबत घोषणा केली. निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते गिरीश कासारवल्ली यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, निवड समितीतील १६ सदस्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या मल्याळम चित्रपटाची एकमताने निवड केली. या चित्रपटाची निवड करण्यापूर्वी सर्व सदस्यांशी दीर्घ चर्चा केल्याचे कासारवल्ली यांनी सांगितले.

‘‘आम्ही एका आठवडय़ाच्या कालावधीत २२ चित्रपट पाहिले. त्यानंतर या चित्रपटाची निवड केली. या २२ चित्रपटांपैकी अनेक चित्रपट दर्जेदार होते. त्यामुळे हा एक कठीण निर्णय होता. प्रत्येक चित्रपटाचे विश्लेषण केल्यानंतर आम्ही ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ या चित्रपटाची निवड केली,’’ असे कासारवल्ली म्हणाले. या २२ चित्रपटांमध्ये ‘केरळ स्टोरी’, ‘रॉकी और रानी की प्रेमकहाणी’, ‘गदर-२’ या हिंदी चित्रपटांसह ‘वाळवी’, ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटांचीही चर्चा झाली.

union minister dharmendra pradhan in pune, india won 100 medals due to fit india, fit india and khelo india
फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य
Ojas Deotale from Nagpur praised by devendra Fadnavis
सुवर्णपदक विजेता नागपूरच्या ओजसचे फडणवीसांकडून कौतुक
booker award Board of Examiners
बुकरायण : वाचणाऱ्यांचे ‘बुकर’वर्ष..
Waheeda Rehman conferred with Dadasaheb Phalke Award
दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेल्या वहिदा रेहमान यांनी त्यांच्या चित्रपटांत ‘भारतीय स्त्री’चे चित्रण कसे केले आहे?

‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’ चित्रपटाविषयी.

ज्युड अँथनी जोसेफ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतीय लोकाचार, परिस्थिती आणि नागरिकांचे मनोविश्व यावर प्रकाश टाकतो. हा चित्रपट २०१८ मध्ये केरळला आलेल्या आपत्तीबद्दल बोलतो. मात्र केवळ भारताचेच नव्हे तर जगभरात घडत असलेल्या आपत्तीचेही प्रतिनिधित्व करतो. चित्रपट सिनेमॅटिक आणि तांत्रिकदृष्टय़ाही उत्कृष्ट आहे, अशी माहिती गिरीश कासारवल्ली यांनी दिली. हा चित्रपट हवामान बदल आणि तथाकथित विकासकामांबाबतही भाष्य करतो, असे ते म्हणाले. टोविनो थॉमस या अभिनेत्याने या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2018 everyone is a hero from india for oscars entry ysh

First published on: 28-09-2023 at 00:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×