राज्यसभा निवडणुकीच्या वेळी क्राँस व्होटिंग केल्याने विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र घोषित केले होते. या सहा आमदारांनी तीन अपक्ष आमदारांसह शुक्रवारी दिल्लीत भाजपात जाहीर प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला आता मोठा धक्का मानला जात आहे. सहा आमदारांनी राजीनामा दिला असल्याने येथे १ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आल्यास काँग्रेसचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे संख्या असतानाही काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे सहा आमदार व तीन अपक्ष अशा नऊ जणांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याने हर्ष महाजन विजयी झाले. दरम्यान, २९ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरविले होते.

Alibag, Alibag assemble seat, shetkari kamgar paksh, Shekap, Jayant Patil, Congress Claims Alibag Assembly Seat Congress, Assembly Seat, Maha vikas Aghadi, Election Defeat, maharasthra asselmbly election 2024, Seat Claim
विधानसभा निवडणुकीतही शेकापची कोंडी करण्याची काँग्रेसची खेळी
Kumari Selja interview Haryana Congress Haryana state Assembly elections
पक्षांतर्गत दुफळी, प्रचाराच्या दोन वाटा! विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा काँग्रेसमध्ये नेमके काय सुरु आहे?
Communist Party Of India, Assembly Seat List, Maha vikas Aghadi, Maha vikas Aghadi Leaders, Maharashtra Elections, Maharashtra Assembly Elections 2024, marathi news, maharashtra news,
लोकसभेत प्रचार केला, आता विधानसभेच्या जागा द्या, घटक पक्षांचे मविआवर दबावतंत्र
nana patole on congress mla cross voting
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा दावा; नाना पटोले म्हणाले, “ज्या आमदारांनी…”
Wardha Political Aspirants Emerge After Lok Sabha Results Congress Leaders Seek MLA Tickets
काँग्रेसला सुगीचे दिवस…पण, दावेदारांसोबतच डोकेदुखीही वाढली…वर्धेत तर एका नेत्याने…
is Congress building a front on 288 seats on its own for the assembly elections
आघाडीत बिघाडी होणार…? काँग्रेसकडून सर्व २८८ जागांवर…
maha vikas aghadi agree to share seat for small parties in assembly elections zws 70
विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय
Key takeaways from PM Modi replies in Parliament
हिंदू धर्म ते मणिपूर! विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी काय उत्तरे दिली?

हेही वाचा >> अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून संदेश; म्हणाले, “भाजपाचा द्वेष करू नका…”

भाजपाने तिकिट नाकारलं, तरी त्याच पक्षात सामिल

तसंच, आशिष शर्मा (हमीरपूर मतदारसंघ), होशियार सिंग (डेहरा) आणि केएल ठाकूर (नालागढ) या तीन अपक्ष आमदारांनी शुक्रवारी विधानसभा सचिव यश पॉल शर्मा यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आणि ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही अपक्ष आमदारांनी भाजपाचं तिकीट मागितलं होतं परंतु त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, नंतर काँग्रेसने ४० आमदारांसह सरकार स्थापन केले तेव्हा तीन अपक्षांनी सरकारला पाठिंबा दिला.

मुख्यमंत्र्यांवर नाराजी

भाजपात प्रवेश केलेल्या अपक्ष आमदारांनी सांगितले की, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू अशा पातळीवर झुकले आहेत की ते आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सखू म्हणाले, अपक्ष आमदारांनी राजीनामे देऊ नयेत आणि जनतेच्या आदेशाचा आदर करायला हवा होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये पैशांचा सहभाग होता की आमदारांवर दबाव होता, हे तपासण्याचा विषय आहे.

पोटनिवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर होणार?

काँग्रेसचे सहा आमदार अपात्र ठरल्याने ६८ सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ ४० वरून ३४ वर आले आहे. तर भाजपचे २५ आमदार आहेत. पोटनिवडणुकीत भाजपाचे सहा आमदार जिंकून आल्यास भाजपाचं संख्याबळ ३१ होणार आहे. तसंच, तीन अपक्षांचा पाठिंबा मिळाल्याने ही संख्या ३४ वर जाईल. त्यामुळे आगामी काळात हिमाचल प्रदेशमध्ये अटीतटीची लढत दिसणार आहे.