नदीमध्ये बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४६ प्रवासी जखमी झाले आहेत.  ओदिशातील कटक जिल्ह्यातल्या जगतपूरमध्ये ही घटना घडली आहे. म्हशीला धडकून ही बस महानदी पुलावरून खाली कोसळली.  इतर प्रवाशांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली. बस नदीत कोसळल्याची घटना घडली त्यानंतर तिथे लोकांची गर्दी जमा झाली. पोलीस आणि इतर लोकही या ठिकाणी जमले, बघ्यांचीही गर्दी झाली होती. आता या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी रूग्णवाहिकाही बोलावण्यात आल्या. त्यानंतर तातडीने लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 people dead after a bus carrying around 30 passengers fell from the mahanadi bridge near jagatpur in cuttack today
First published on: 20-11-2018 at 21:02 IST