नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पक्षाने महिला मतदारांना डोळय़ासमोर ठेवून ‘मुख्यमंत्री महिला सन्मान’ या नावाने नवी ‘लाडली बहना’ योजना लागू केली आहे. या योजनेसाठी २ हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूदही केली असून १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांना दरमहा १ हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या तत्कालीन शिवराज सिंह सरकारची ‘लाडली बहना’ योजना विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवणारी ठरली होती. त्याचाच कित्ता ‘आप’ने गिरवला आहे.

Ajit Pawar, ncp, local body election,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार; अजित पवार यांची मोठी घोषणा!
bjp meeting
लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भाजप आमदारांना भोवणार? ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपासह विविध मुद्द्यांवर खल
Congress, Wardha, Lok Sabha elections,
वर्धा : लोकसभा निवडणुकीवेळी का आले नाही? काँग्रेस नेत्यांचा निरीक्षकास सवाल
maharashtra legislative council marathi news
फुटलेल्‍या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांच्या नावाची चर्चा…त्या म्हणाल्या, “स्थानिक राजकारण…”
is Congress building a front on 288 seats on its own for the assembly elections
आघाडीत बिघाडी होणार…? काँग्रेसकडून सर्व २८८ जागांवर…
ramesh keer, Congress, niranjan davkhare,
काँग्रेसचे रमेश कीर मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरेंची हॅटट्रीक
Milind Narvekar from Shiv Sena Thackeray faction in Legislative Council elections
विधान परिषद निवडणुकीत चुरस; शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी
Wardha, victory, Lok Sabha,
लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे प्राधान्यात बदल, आता ‘हा’ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर

अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आतिशी यांनी ‘मुख्यमंत्री महिला सन्मान’ योजनेची घोषणा केली. निवृत्ती वेतनाच्या इतर कोणत्याही योजनेची लाभार्थी नसलेली व करदाता नसलेली दिल्लीची १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. लाभार्थीकडे दिल्लीतील मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>>‘डीएमके’नं लुटलेले जनतेचे पैसे मी परत करणार; मोदींची तमिळ जनतेला गॅरंटी

‘आप’लाही रामराज्याची आठवण

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर रामराज्य हा राजकीय शब्द बनला असून ‘आप’लाही रामराज्याची आठवण झाली आहे. रामराज्य अवतरण्यासाठी अजून खूप काही करणे बाकी असले तरी त्यादृष्टीने नऊ वर्षांमध्ये आप सरकार बरेच काम केलेले आहे, असे आतिशी अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या.

‘तीन मंत्री तुरुंगात तरीही रामराज्य?’

‘आप’च्या रामराज्याच्या उल्लेखाची भाजपने खिल्ली उडवली आहे. ज्या सरकारमधील तीन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत, त्यांना आता रामराज्याची आठवण होत आहे. ज्यांचे शिक्षणमंत्री दारूमंत्री असतात, तिथे रामराज्य कसे अवतरणार, असा सवाल भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केला.