दिल्लीतल्या मद्य धोरण प्रकरण उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांना तुरुंगात जावं लागलं आहे. मात्र या प्रकरणात आता रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आम आदमी पार्टीचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी मनिष सिसोदियांच्या अटकेप्रकरणी आता मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मनिष सिसोदियांना तिहारमधल्या क्रमांक १ च्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. कारण भाजपाला तुरुंगातच त्यांची हत्या घडवून आणायची आहे असा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे सौरभ भारद्वाज यांनी?

तिहारच्या तुरुंग क्रमांक १ मध्ये फर्स्ट टाइम अंडर ट्रायल कैद्याला ठेवलं जात नाही. कारण या क्रमांक १ च्या तुरूंगात भयंकर क्रूर असे कैदी आहेत. हे कैदी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि मनोरूग्ण झालेले आहेत. एका छोट्याश्या इशाऱ्यावर ते कुणाचीही हत्या करू शकतात. अशा लोकांमध्ये मनिष सिसोदियांना ठेवण्यात आलं आहे. आम्ही भाजपाचे राजकीय विरोधक आहोत. पण अशा प्रकारचं शत्रुत्व कधी तुम्ही राजकारणात पाहिलं आहे का? भाजपा दिल्लीत आमचा पराभव करू शकली नाही त्यामुळे आता ते आमचा असा बदला घेणार का? असाही प्रश्न सौरभ भारद्वाज यांनी विचारला आहे. तसंच पंतप्रधान या सगळ्या प्रकरणात गप्प का बसले आहेत? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party sanjay singh and saurabh bharadwaj targets pm modi and bjp over manish sisodia arrest in delhi liquor policy scam scj
First published on: 08-03-2023 at 17:16 IST