Ankita Bhandari Murder Case : उत्तराखंड येथील पौरी न्यायालायाने शुक्रवारी २०२० साली घडलेल्या अंकिता भंडारी हत्या प्रकारणा तीन जणांना दोषी ठरवले आहे. तसेच या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रीना नेगी यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या हत्याकांडाने त्यावेळी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. पण नेमकं हे प्रकरण काय होतं याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
नेमकं प्रकरण काय आहे?
१८ सप्टेंबर २०२२ च्या रात्री ऋषिकेश येथील वनांत्रा रिसॉर्टमध्ये अंकिता भंडारी नावाच्या १९ वर्षीय रिसेप्शनिस्टची तीन जणांनी हत्या केली. ज्यामध्ये भाजपाचे माजी नेते विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य ज्याने तिला नोकरीवर ठेवले होते याचा देखील समावेश होता. पोलिसांनी सांगितले की, पुलकित याने रिसॉर्टमधील काही ग्राहकांना ‘स्पेशल सर्व्हिस’ देण्यास नकार दिल्याने अंकिताची हत्या केली. दरम्यान या तिघांनी हत्येची कबुली दिल्याच्या दुसर्या दिवशी २४ सप्टेंबर रोजी अंकिताचा मृतदेह हा चिल्ला कॅनलमध्ये आढळून आला होता.
पुलकित आर्या याला आयपीसी कलम ३०२ (हत्या), २०१, ३५४ अ आणि अवैध तस्करी कायदा याअंतर्गत शुक्रवारी दोषी ठरवण्यात आले आहे. दुसरा आरोपी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता हे देखील हत्या, पुरावे लपवणे आणि अवैध तस्करी अशा गुन्ह्यात दोषी आढळले आहेत.
अंकिता भंडारी कोण होती?
अंकिता भंडारी ही पौरी येथील एका अत्यंत गरीब कुटुंबातील होती, ती शिक्षणसाठी शहरात आळी होती. तिचे वडील बिरेंद्र भंडारी हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तिने हॉटेल मॅनेजमेंट शिक्षणासाठी एका संस्थेत प्रवेश घेतला होता, पण करोना काळात पैशांची अडचण असल्याने तिने शिक्षण अर्ध्यात सोडले होते.
अंकिताचा मित्र पुष्प याने ऋषिकेश येथील रिसॉर्टमध्ये नोकरी असल्याचे सांगितले( पुढे हा मित्र प्रकरणात साक्षीदार बनला). अंकिताने ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या पहिल्या महिन्यातच तिने पुष्प याला सांगितले की, आरोपी तिला १० हजार रुपयांच्या बदल्यात व्हिआयपी लोकांना ‘विशेष सेवा’ देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत आहेत.
पुष्प याने न्यायालयाला सांगितेल की, रात्री ८.३२ वाजता पीडिता त्याच्याशी अखेरची बोलली होती आणि आरोपी तिच्याबरोबर असून तिला भीती वाटत असल्याचेही तिने सांगितले होते.
या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, “आरोपीला मृताच्या वडिलांशी बोलू इच्छित होता… (आणि) यामुळे मृत खूपच वैतागली होती. एका सकाळी मृतक रिसॉर्टमधून बेपत्ता झाली. ती तिच्या खोलीत नव्हती. तपासादरम्यान असे आढळून आले आही, आरोपीने रिसॉर्टमध्ये तिचा विनयभंग केला. ते तिच्यावर पाहुण्यांना अतिरिक्त सेवा देण्यासाठी दबाव आणत होते, ज्यासाठी मृतक तयार नव्हती. अर्जदार (अंकित गुप्ता)आणि सह-आरोपींना अशी भीती होती की कदाचित ती हे इतरांना सांगेल. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार , १८.०९.२०२२ रोजी, अर्जदाराने सह-आरोपींसह तिला रिसॉर्टमधून बाहेर घेऊन गेले, त्यांनी मृतक (अंकिता भंडारी) हत्या केली आणि तिला कालव्यात ढकलले. २४.०९.२०२२ रोजी तिचा मृतदेह सापडला.”
पुढे काय झाले?
या प्रकरणाची संपूर्ण देशभारत चर्चा झाली त्यानंतर तीन आरोपी – पुलकित आणि त्याचे सहकारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले. याचवेळी जिल्हा प्रशासनाने रिसॉर्टचा काही भाग देखील पाडून टाकला. ज्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी असे करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला. पुलकित याच्या अटकेनंतर भाजपाने त्याचे वडील विनोद आणि थोरल्या भावाला पक्षातून काढून टाकले. विनोद आर्या हे त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.
ज्या रात्री अंकिता भंडारीची हत्या करण्यात आली तेव्हा आरोपीने स्थानिक पटवारीला (हा परिसर महसूल पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने) ती गायब झाल्याबद्दल सांगितले होते. पण तक्रार दाखल केली नाही. पटवारी वैभव प्रताप याने याबद्दल कोणालाही माहिती दिली नाही आणि तो सुट्टीवर निघून गेला. जेव्हा हे प्रकरण उजेडात आले तेव्हा हे प्रकरण २२ सप्टेंबर रोजी पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) प्रतापला निलंबित केले आणि नंतर त्याला निष्काळजीपणा आणि आरोपींची बाजू घेतल्याच्या संशयावरून अटक केली. या घटनेमुळे राज्यातील महसूल पोलिस यंत्रणेवर चिंता व्यक्त झाली होती आणि विधानसभा अध्यक्ष रितू खंडुरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महसूल पोलिसांच्या जागी नियमित पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
डिसेंबर २०२२ रोजी ५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. एसआयटीनच्या आरोपपत्रानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी उत्तराखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. पण कोर्टाने ही याचिका फेटाळली, आणि तपासाबद्दल समाधान व्यक्त केले.