यती नरसिंहानंद यांना चिथावणीखोर भाषणं देणं महागात पडणार असल्याचं दिसतंय. अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी यती नरसिंहानंत यांचं एक वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं मान्य केलंय. तसेच नरसिंहानंदांविरोधात न्यायालयाची अवमाननाप्रकरणी खटला दाखल करण्यास परवानगी दिलीय. त्यामुळे आधीच चिथावणीखोर भाषणांप्रकरणी आरोपी असलेल्या नरसिंहानंदांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय.

मुंबईत राहणाऱ्या शाची नेल्ली यांनी नरसिंहानंद यांचं एक वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं सांगितलंय. तसेच या वक्तव्यप्रकरणी नरसिंहानंदांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला सुरू करण्याची परवानगी मागितली. यावर अटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी देखील हे वक्तव्य न्यायालयाचा अपमान करणारं असल्याचं मान्य करत खटला चालवण्यास परवानगी दिली. नरसिंहानंद चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत.

pune crime news, pune fake gst officer fraud marathi news
पुणे : ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याची लूट
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
The High Court reprimanded the government to be sensitive to the demand for the house of the eyewitnesses of the 26 11 attacks Mumbai news
२६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीच्या घराच्या मागणीबाबत संवेदनशीलता दाखवा; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

“सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवणाऱ्यांना कुत्र्याचं मरण येईल”

वेणुगोपाल यांनी या खटल्याला परवानगी देताना म्हटलं, “मी शाची नेल्ली यांनी पाठवलेलं पत्र वाचलं. तसेच नरसिंहानंद यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ देखील पाहिला. यात नरसिंहानंद यांनी ‘जे लोक लोक या व्यवस्थेत, राजकारण्यांवर, सर्वोच्च न्यायालयावर आणि सैन्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना कुत्र्याचं मरण येईल’, असं बोलत आहेत.”

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : वैवाहिक बलात्कार म्हणजे काय? हे प्रकरण नक्की न्यायालयामध्ये का चर्चेत आहे?

“नरसिंहानंदांचं वक्तव्य सामान्यांच्या मनात सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा हनन करणारं”

“नरसिंहानंदांचं वक्तव्य सामान्यांच्या मनात सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा हनन करणारं आहे. हा निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान कायदा कलम १५ नुसार गुन्हेगारी स्वरुपाचा खटला चालवण्याची परवानगी दिली जात आहे,” असंही वेणुगोपाल यांनी नमूद केलं.