बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता नसरुद्दीन शाह आणि गीतकार जावेद अख्तर हे तुकडे-तुकडे गँगचे एजंट असल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपा नेते नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये असणाऱ्या मुद्द्यांवर या तिघांकडून भाष्य केलं जात असल्याची टीका नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे.

“शबाना आझमी, नसरुद्दीन शाह आणि जावेद अख्तर हे स्लीपर सेल असणाऱ्या तुकडे-तुकडे गँगचे एंजट असून, फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये घडणाऱ्या घटनांवर वाद निर्माण करतात,” असा नरोत्तम मिश्रा यांचा आरोप आहे. बिल्किस बानो प्रकरणी आरोपींची १५ वर्षानंतर कारागृहातून निर्दोष सुटका झाल्यानंतर शबाना आझमी यांनी जोरदार टीका केली आहे.

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

“काँग्रेस देशातून नष्ट…”, अमित शाह यांचं मोठं विधान, म्हणाले “भाजपाच तुमचं भविष्य”

“माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. मला प्रचंड लाज वाटत आहे. याशिवाय माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही,” असं शबाना आझमी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं होतं. नरोत्तम मिश्रा यांनी शबाना आझमी काँग्रेसशासित राज्यांमधील मुद्द्यांवर मात्र भाष्य करत नसल्याची टीका केली आहे.

ते म्हणाले “राजस्थानमध्ये कन्हैय्यालालची हत्या झाली किंवा झारखंडमध्ये महिलेला जिवंत जाळलं यावर शबाना आझमी काही भाष्य करत नाहीत”. “तुकडे-तुकडे गँग किंवा अवॉर्ड वापसी गँगला हे अजिबात दिसत नाही. यावरुन त्यांची वाईट विचारसरणी उघड होत आहे. कोणीही त्यांना सुसंस्कृत किंवा धर्मनिरपेक्ष कसं काय म्हणू शकतं?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.

शबाना आझमी यांनी नुकतंच बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींची सुटका करण्याच्या निर्णयाविरोधात महिला संघटना आणि विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता.